Posted in धना

Introduction to PHP

  1. Introduction to PHP

1.1 Writing a Simple PHP Script

PHP file can include simple text, HTML codes and PHP script. A PHP script always starts with <?php tag and ends with the ?> tag or like start with <? and end with  ?> tag called short php tag. These scripts are  embedded in the body tag of the HTML file.  A PHP file is saved with a  .php extension e.g. (index.php).

Some  PHP scripts are:         

  •  To display current data using the PHP script:
  1. Open the EditPlus text editor.
  2. Enter the following code: 

<HTML>
<BODY>
The data is:
<?php   echo gmdate(“M d Y”);     ?>
</BODY>

</HTML>

figure 1.1

Note the  PHP script is placed within the <body></body> tag of the HTML code. The text enclosed within <?php and ?> tag is sent to the PHP script engine for process. After processing of the PHP script, the contents are returned to the browser as a normal Web page with the concern data.

  1. Save the file with name, date.php under the /xampp/htdoc/yg_practice (your website folder name).
  2. Open the Mozilla Web browser.
  3. Type http://localhost/date.php in the address bar and press the Enter key.                                                         

The output appears as shown in figure 1.2.

2

  • In the PHP script, the echo command displays contents in the Web browser. The gmdate( ) function enables us to display current date and time in browser. The gm gmdate( ) function stands for Greenwich Mean Time. This function displays the month of the current date. The letter “M”, in date function displays only first three letters of the month. The letter “d”, in date function displays the current date and “Y” displays the current year. The letter “Y”, displays all the four digits of the year
    To display simple text in the browser using PHP script:

1. Open the EditPlus text editor.
2. Enter the following code in editor:

<HTML>
<BODY>
<?php echo “Hello Everybody”;
?>
</BODY>
</HTML>

After entering the code in text editor, the text appears as shown in Figure 1.3.

1.3
Note the commands is used is to display the text. The text to be displayed is enclosed within double quotes.

3. Save the file with the name, stringdisp.php under the xampp/htdoc.
4. Open a Mozilla Web browser.
5. Type http://localhost/yg_practice/stringdisp.php in the address bar and click           on go button.
The output appears, as shown in Figure 1.4

1.4

  • To display simple text in the browser using PHP script:
    1. Open the EditPlus text editor.
    2. Enter the following code in editor:

<HTML>
<BODY>
The string is:
<?php
$str = “My name is Samson”;
Echo $str;
?>
</BODY>
</HTML>

After entering the code in text editor, the text appears as shown in Figure 1.5

1.5

In this example, the text is assigned to the variable name str . The second line provides the content of the variable str to the command.The echo command displays the content of str variable.

    3. Saves the file with the name, stringname.php under the                  xampp/htdoc/yg_practice.
4. Open a Mozilla Web browser.
5. Type http://localhost/strringname.php in the address bar and click on enter button.

The output appears, as shown in in Figure 1.6.

1.6

Author:

I am determined to be cheerful and happy in whatever situation I may find myself. For I have learned that the greater part of our misery or unhappiness is determined not by our circumstance but by our disposition. Facebook Profile: https://www.facebook.com/y.gavhale1 Email : y.gavhale@gmail.com

9 thoughts on “Introduction to PHP

  1. 77769 78887:19. :-
    आपल्या ग्रुपवर “धना” ही मालिका / कादंबरी दररोज वाचनास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    या कादंबरीचे एकूण २० भाग आहेत. दररोज १ भाग वाचता येईल.

    “धना”
    -: भाग 19. :-

    दुरवर दम खात असलेला धना आणि त्याच्या हातातील नुकतीच बार टाकलेली बंदूक धूर टाकत होती ..धनाला पाहून राजलक्ष्मीच्या मनात आनंदाचे काहूर निर्माण झाले …पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला ….तिने डोळे वटारले ….भीतीने तिने आर्त किंकाळी टाकली आणि धनाकडे पाहू लागली…धनाला काही समजले नाही…तो मागे वळून पाहू लागला तर एकाच वेळी ५-६ भुकेले वाघ त्याच्या दिशेने येत होते. ……धनाच्या बंदुकीतील २ बार आधीच उडाले होते….आणि वाघ केवळ एका झेपेच्या अंतरावर आले होते ……!!

    ईसवी सन 2016…..कोल्हापुर

    आई वाच ना पुढे काय झाले …??
    पाणावलेल्या डोळ्यांनी स्तब्ध झालेली निशिगंधा ,राजनंदिनीच्या बोलण्याने भानावर आली…डोळ्यावर आलेला अश्रूंचा पूर आपल्या हातानी ती पुसत पुन्हा हुंदके देऊ लागली ..आणि तिच्या हुंदक्यात राजनंदिनी चा हुंदका सुध्दा सामील झाला …दोघानाही अश्रू अनावर होते…!

    निशिगंधा हि सातारच्या मोठ्या मातब्बर घराण्यातील मुलगी,वनखात्यातील सुर्याजीरावांसोबत ३० वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता.
    ३० वर्षाच्या सुखाच्या संसाराच्या वेलीवर “राजनंदिनी” च्या येण्याने ब्रम्हकमळ उमलले आणि संसाराचे सार्थक झाले.
    आनंदाला,समाधानाला काहीच कमी नव्हते पण का कोणास ठाऊक सूर्याजीराव आयुष्यभर काहीतरी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवत आहेत अशी ठाम धारणा निशिगंधा ची होती,वारंवार खोदुन विचारून सुध्दा तिला सूर्याजीने काहीच सांगितले नव्हते.संसार सुखाचा चालला होता ,पण सुर्याजीरावान्च्या नजरेत का कोणास ठाऊक तिला काहीतरी लपलेले गूढ तिला दिसत होते.पण सुरुअजीने आजन्म एक शब्द देखील याबद्धल बोलला नव्हता …तो म्हणत असे …अग डोळ्यात काय पाहतेस ..पाह्यचे असेल तर माझ्या हृदयात पहा..!
    त्याच्या अश्या बोलण्याने निशिगंधा पुन्हा काही विचारातच नसे…!

    सूर्याजीराव आणि निशिगंधा महाराष्ट्र सोडून अनेक वर्षापासून दिल्ली ला स्थायिक झाल्या होत्या,अनेक वर्षे वनखात्याची सेवा बजावून सूर्याजी सेवानिवृत्त झाले …पण काही केल्या त्यांच्या डोळ्यात खोल कुठेतरी अत्यंत मोठे गूढ लपले होते,ते निशिगंधा ला काही केल्या त्याने सांगितलेले नव्हते.
    गेल्याच वर्षी सूर्याजीराव आजारपणामुळे त्यांच्यातून निघून गेले होते,त्यांची शेवटची इच्छा होती कि तुम्ही सारे महाराष्ट्र कोल्हापुरातील आपल्या जुन्या वाड्यावर स्थायिक व्हावे,राजनंदिनी ने महाराष्ट्रच यावे …पण नवीन विचार ,नवीन पिढी .
    कोणालाच त्याची तळमळ समजली नव्हती..!

    राजनंदिनी उच्चशिक्षित झाली,तिच्या बुद्धी कौशल्यावर अमेरिकेतील नामवंत संगणक निर्माण करणार्या कंपनीत ती गेल्याच वर्षी मोठ्या पगारावर आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला लागली होती…!
    मुलगी तरुण झाली कि नैसर्गिक भावभावनांना उधाण येणे साहजिकच असते,मात्र या उधाणाला संस्काररुपी बांध असलाच पाहिजे,नाहीतर हा भावनेचा महापूर तिचे स्वताचे जीवन नव्हे तर तिच्याशी निगडीत प्रत्येक माणसाचे आयुष्य वाहून न्यायला सुध्दा कमी पडत नसतो.
    राजनंदिनी च्या बाबतीत सुध्दा असेच घडले होते,ती शिकली होती,सुसंस्कृत होती मात्र एवढे असूनही ती भावनेच्या हा खोल मायाजालात गुंतली होती.
    अमेरिकेतील तीच एक वर्षापूर्वी ओळख झालेला आणि अमेरिकेचा नागरिक असणारा जो मायकल स्टीफनस या मुलासोबत तिचे मन जुळले होते..काही केल्या तिला त्याला सोडून जगणे हा विचार सुध्दा आता सहन होत नव्हता..!
    हि गोष्ट तिने निशिगंधा च्या कानावर घातली होती.
    निशिगंधा ने प्रारंभी विरोध दर्शवला मात्र,सुर्याजीरावांच्या आकस्मित जाण्याने हळवी झालेल्या निशिगंधाने पुन्हा तिने होकार दिला होता..!

    सुर्याजीच्या वर्षश्राद्धाला राजनंदिनी अमेरिकेहून आली होती आणि रिवाजाप्रमाणे त्यानी त्याचे वर्षश्राध्द कोल्हापुरात जुन्या वाड्यावर घातले होते..!
    अमेरिकेतील पाश्चात्य संस्कृतीत रूळलेली राजनंदिनी आणि दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत सुखाचे आयुष्य व्यथित केलेल्या निशिगंधाने बर्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या भूमीत पाऊल ठेवले ,इथली अवखळ मात्र बंड शिकवणारी हवा त्यांना स्पर्शू लागली …इथले डोंगर,गडकोट किल्ले ,इतःली संस्कृती पदोपदी दिसू लागली.
    कोल्हापुरात त्यांचा मोठ्ठा वाडा होता,सूर्याजीने अनेक वर्षापूर्वी इथेच राहायचा विचार करून तो बांधला होता ,पण सरकारी आदेशामुळे त्याना दिल्ली येथे जावे लागले आणि इथला वाडा त्यानी काही जवळच्या लोकांना सांभाळायला दिला व तो दिल्लीत राहू लागला…..!
    राजनंदिनी आणि निशिगंधा वाड्यावर उतरले..!
    विश्रांती आणि जेवणखाण झाले …या वाड्याच्या प्रत्येक वस्तूवर सुर्याजीच्या आठवणी होत्या ,राजनंदिनी सूर्याजीची लाडकी लेक होती..!
    मोठ्या लाडाने त्याने तिचे नाव राजनंदिनी ठेवले होते …तिने मोठे झाल्यावर विचारले सुध्दा कि आबा सांगा माझे नाव राजनंदिनी का ठेवेले ?
    तेव्हा सूर्याजी हसत म्हणायचा कि तू मागच्या जन्मीची राजकुमारी वाटतेस म्हणून ..मगते दोघेही हसायचे…!
    सुर्याजीच्या या आठवणी राजनंदिनीने मनात जपल्या होत्या.
    राजनंदिनी सुर्याजीच्या जुन्या वस्तू मोठ्या मायेने स्वच्छ पुसत होती आणि जुन्या वस्तू पाहता पाहता तिला दोन जुन्या चाव्या सापडल्या…तिने त्या आईला दाखवल्या .
    या चाव्या नेमक्या कशाच्या म्हणून दोघीही मायलेकींनी सारा वाडा शोधून काढला ..तेव्हा त्याना त्या वाड्याच्या खालच्या सोप्यात एक गुप्त दार सापडले,याला तळघर म्हणत असे…अनेक जुन्या वाड्यात आजही तळघरे पहायला मिळतात.
    त्यानी दिवाबत्ती घेऊन त्या दाराला त्यातील एक चावी लावली आणि गेली कित्येक वर्षे बंद असलेला तो दरवाजा उघडला ….जाळ्यातून वात काढत दोघींनी मोठ्या धाडसाने आत प्रवेश केला.
    दिव्याच्या प्रकाशात आतील कोंदट वातावरणात अनेक जुन्या तलवारी,बंदुका ठेवल्या होत्या,लांघ -लंगोट ,लाकडी गदा आणि बरेच काही दिसत होते , आणि समोरच एक मजबूत जुनी लाकडी पेटी ठेवली होती.
    त्याला भलेमोठे कुलूप लावले होते ,त्या कुलपात उरलेली एक चावी लावून बघितली तर कुलूप क्षणात उघडले गेले …..पेटीचा वरचा भाग उघडला आणि आत भगव्या कापडात बांधून ठेवलेल्या २ भल्या मोठ्या डायर्या (वह्या) सापडल्या..सोबत काही सोनेरी आभूषणे ..गळ्यात घालायची चांदीची पेटी होती.
    हे सर्व साहित्य दोघींनी उचलून वाड्याच्या वर आणले आणि तळघर पुन्हा बंद करून ठेवले…!
    काय असावे या डायर्यामध्ये ?
    सूर्याजीराव जन्मभर जी रहस्ये मला बोलले नाहीत कदाचित ती तर नसावीत ?
    निशिगंधा आणि राजनंदिनीला राहवत नव्हते.
    रात्री दोघींची जेवण उरकले आणि राजनंदिनी आईला बोलली ..आई काय गूढ असेल या वह्यांमध्ये ?

    दोघींनी त्या डायरी मध्ये काय असेल हि उत्सुकता मनी घेऊन त्या वहीतील पहिली वही उघडली ,त्यात काही हिशोब,हाताने काढलेले नकाशे व इतर काही सांकेतिक शब्दातील मजकूर होते….!
    दोघीना त्यातील काहीच समजले नव्हते.
    ती वही झाकून ठेवली आणि दुसरी उघडली ……..आणि त्यात सूर्याजीने लिहून ठेवला होता त्याचा अद्भुत,अलौकिक असा भूतकाळ….!

    डायरीचे एक एक पान निशिगंधा वाचू लागली आणि तो भूतकाळ झरझर दोघींच्याही डोळ्यासमोर दौडू लागला…ते निसर्गरम्य गाव…बांधीव तालीम..ते तालमीतील षडूड्चे घुन्त्कार……ते कुस्त्यांचे मैदान…हलगी घुमक्यांचे मर्दानी स्वर …..ते पाणीदार डोळे..नाजूक असे स्मितहास्य….धनाची -राजलक्ष्मी ची पहिली भेट…..मैदानातील पराभव….नरभक्षी वाघाची जीवघेणी डरकाळी….तो रक्ताचा फवारा….तळ्या शेजारची सूर्याजीची छावणी…खासबागेतील कुस्ती..उधाळलेला हत्ती …स्फोट….गोळीबार….सर्वकाही डोळ्यासमोर दिसू लागले होते..!

    ज्या माणसाशी आपण ३० वर्षे संसार केला त्याचा भूतकाळ इतका चित्तथरारक आणि अद्भुत असेल याची काडीमात्रही शंका निशिगंधाला नव्हती..!
    इतके वर्षे दिल्लीत राहून महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास,इथली परंपरा,इथली संस्कृती हि इतकी हृद्यास्पर्शी असेल हे केवळ आठवूनच दोघीही मायलेकींचे डोळे भरून आले…!

    राजनंदिनीला ला तर धना डोळ्यासमोर दिसत होता,त्याचे वागणे,चालणे,बोलणे,त्याचे धिप्पाड शरीर,करारी नजर,देशावर मरायची आग…आणि एवढे असूनही एक पवित्र प्रेमासाठी त्याचाही होत असलेली धडपड.
    खरोखर विलाक्ष्ण होते हे सारे.
    आजवर तिने अतिशय उच्च शिक्षण घेतले,परदेशातील जीवन हे सर्वात समृध्द असे जीवन आहे असे तिला मनोमन वाटत असे आणि तिथेच लग्न करून स्थायिक होण्याच्या तिच्या विचाराना तिच्या वडिलांच्या डायरीने जणू मुठमाती दिली होती….तिला इथल्या मराठी मातीला हातात घ्यावे वाटू लागले आणि ती भरल्या नयनांनी वाड्याच्या बाहेर आली ..तिने ती चिमटभर माती घेतली,कपाळाला लावली..जिभेवर टाकली …आणि या मातीचा गोडवा तिच्या रक्ताच्या पेशीपेशीत अजूनही जिवंत असलेल्या सुर्याजीच्या सुप्त विचाराना जागृत करू लागला …तिच्या डोळ्यांनी अश्रुंचा जणू धबधबा सुरु केला ..हृदयाची कंपने वाढू लागली…हुंदका अनावर झाली आणि धाय मोकलून रडू लागली….तिला अमेरिका ,जो मायकल स्टीफनस हे सारे परकी वाटू लागली….!
    विजार-शर्ट घालून अमेरिकेतील उच्चभ्रू जनजीवनात वावरन्यापेक्षा साडी नेसून,कुकवाने भरलेल्या कपळाने प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा आपल्या धनाला क्षणभरही न विसरणारी राजलक्ष्मी तिला राहून राहून आठवू लागली..!
    कर्तव्यासाठी जिवलगांच्या ताटातुटी करणारी हि माझी मराठी संस्कृती आजवर मला का कोणी सांगितली नाही….मनात मरेपर्यंत केवळ धनाच ठेवणारी राजलक्ष्मी कुठे आणि आजकालच्या वस्त्रांप्रमाने सहचारी बदलाणारी ती अमेरिकेतील संस्कृती कुठे…?
    तिला राहून राहून लाज वाटू लागली तिच्या आजवरच्या वागण्याची…!

    तिची जी अवस्था होती तीच निशिगंधाची अवस्था.
    सुर्याजीरावांसारखा पराक्रमी पती नशिबाने लाभला पण मरेपर्यंत त्यांचे मन मी समजू शकले नाही याची तिला जाणीव होत होती ,जी पतीचे मन ओळखत नाही ती कसली पत्नी ?
    तिला लाज वाटू लागली आपल्या आजवरच्या वागण्याची.
    धना आणि राजलक्ष्मी च्या विलक्षण प्रेमकथेतून तिला जीवनाचे सार समजू लागले होते…पण आता तर वेळ निघून गेली होती.
    सूर्याजीराव देहाने आज तिच्यासोबत नव्हते ,पण त्यानी अनेक वर्षापूर्वी लिहून ठेवलेली त्यांची डायरी आज सुर्याजीच्यचं रूपाने जणू तिच्याशी बोलत होती.
    हे नशीब पण ना किती विलक्षण आहे..आयुष्यात पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधायला सारी ह्यात जाते आणि जेव्हा उत्तर सापडते…तेव्हा प्रश्नच बदलून टाकलेला असतो..अगदी हीच अवस्था निशिगंधा आणि राजनंदिनीची होती…!

    आई वाच ना पुढे काय झाले …??
    डोळ्यावर आलेले अश्रू पुसता राजलक्ष्मी तिच्या आईला निशिगंधाला विचारू लागली …!
    आणि तिनेही डोळे पुसत डायरीचे पान पालटले ,………!!
    क्रमश: ……….. अंतिम भाग 20 उद्या…..

    लेखन, शब्दांकन, कल्पना : पै. गणेश मानुगडे

    सुचना :

    ह्या कादंबरीच्या प्रत्येक भागाविषयी आपणांस काय वाटते, आपण आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर आवश्य लिहा, तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    या मालिकेचे / कादंबरीचे लेखक : पै. गणेश मानुगडे आहेत.

    जर आपण ही मालिका फॉरवर्ड करत असाल तर भागाच्या शेवटी लेखकाच्या नावाचा उल्लेख आवश्य करावा.

    – वितरक : नवनाथ देवकर (लेखकाच्या संमतीने आणि परवानगीने)

    77769 78887: 
    २०: आपल्या ग्रुपवर “धना” ही मालिका / कादंबरी दररोज वाचनास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    या कादंबरीचे एकूण २० भाग आहेत. आजचा भाग अंतिम आहे. ह्या कादंबरी विषयी आपणांस काय वाटते, आपण आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर आवश्य लिहा, तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    “धना”
    -: भाग 20. (अंतिम) :-

    धनाच्या हृदयाची कंपने अतितीव्र झाली होती, सावध होऊन बंदुकीत बार ठासायाला वेळच नव्हता, राजलक्ष्मी धनाच्या काळजीने अधीर झाली.
    नशिबाने कित्येक दिवसांनी त्याची भेट घडवली होती, पण काही क्षणात आता धना कधीच दिसणार नाही अशी परिस्थिती आली होती.तिचे काळीज फाटू लागले.
    ३-४ वाघ गुरगुरत धनाच्या जवळ येऊ लागले.
    धनाने केवळ बंदूक पुढे धरून कमरेत काहीसा वाकून वाघांच्या समोर उभा होती ….धनाला काही करावे सुचेना.
    एक एक पाउल मागे येत त्याने जगदंबेचे स्मरण केले …आई भवानी केवळ तुझ्या आशीर्वादाने मी आजवर तरलो,पण आता साक्षात मरण पुढे उभे आहे असे वाटू लागले ..पाठीमागे माझी जिवलग जिच्यासाठी आजवर आटापिटा केला आणि पुढे मृत्यू….विलक्षण अश्या कात्रित धनाला नाशिबाने अड़कवले होते आणि काही निमिशात ही कात्री सर्वकाही कापनार होती…!
    वाघ आता झेपेच्या पवित्र्यात आली आणि झेप घेणार धनाने लढायचा पवित्रा घेतला पण मन राजलक्ष्मी कड़े ओढ़त होते..तिच्या मिठिसाठी अधीर होते..फक्त एक घट्ट मीठी आणि परत मरण आले जरी चालले असते…जर त्या वाघाना मानवी भाषा समजत असती तर धनाने नक्कीच त्याना सांगितले असते..अरे थांबा एक क्षण..मला माझ्या प्राणप्रिय प्रेयसीची केवळ एक झलक पाहुद्या..मग खुशाल तुमच्या कराल जबडयात हां धना स्वताहून आपली मान देईल…पण हे अशक्य होते…नियतीची मर्जी…..!
    इतक्यात जंगलातून धडा धड गोळ्यांचे बार वाघांच्या दिशेने येऊ लागले …मातीत गोळ्या आपटून माती फुटू उडू लागली ..एकाच वेळी १०-१२ गोळ्या वाघांच्या पायात घुसू लागल्या आणि वाघांनी आपला जीव धोक्यात आहे हे ओळखून मागे काढता पाय घेतला.
    धनाने प्रसंगावधान राखले आणि झटक्यात मागे वळून राजलक्ष्मी कडे आला..!
    त्याला सेकंदाच्या ही आत ही संधी साधायची होती..जणु जगदंबेनीच झुकते माप धनाच्या झोळीत टाकले होते.
    त्वरेने राजलक्ष्मी चा हात धरून बाजूच्या जंगलात गेला .
    त्याने राजलक्ष्मी चा हात घट्ट धरला होता,त्याची त्याला जाणीव झाली.
    राजलक्ष्मी हुंदके देत धनाच्या मिठीत पडली, धनाने बंदूक टाकली आणि आवेगाने राजलक्ष्मी ला मिठीत घेतेले आणि काही क्षण निशब्द संवाद सुरु झाले.
    अश्रूंचा आणि हुंदक्यांना मर्यादा संपल्या.
    बेभान होऊन दोघेही जन्मोजन्मीच्या विरहानंतर पुन्हा भेटावेत असे भेटत होते..!
    धनाने मिठी काहीशी ढिली केली आणि आपल्या हाताने राजलक्ष्मीचे अश्रू पुसू लागला..!
    किती विलक्षण क्षण असेल हो हा ?
    नशीब किती परीक्षा घेतो जिवलगांच्या भेटीच्या,जणूकाही परीक्षाच घेत असतो कि नाशिबाच्या पुढे यांचे प्रेम टिकून राहील का ?
    पण धना आणि राजलक्ष्मी दोघांनीही नशिबाला हारवले होते.
    आता केवळ विजय होता …!
    निर्धारी शब्दात …राजलक्ष्मीने धनाला म्हणाली ..आता माझा मृत्यू फक्त आणि फक्त तुमच्या मांडीवर व्हावा.मला आता तुमच्याशिवाय जिने नको आहे..!
    धनाने व राजलक्ष्मी पुन्हा घट्ट मिठीत विसावाली आणि क्षणात धना भानावर आला कि काही क्षणापूर्वीच आपण भुकेल्या वाघांच्या तावडीतून कसे निसटलो ?
    पलीकडच्या जंगलातून १०/१२ सैनिक आणि सोबत सूर्याजीराव जखमी अवस्थेत पुढे येत होते
    यानीच जंगलातून गोळ्यांचा पाउस सुरु केला आणि आपण बचावलो..!
    धनाला याची जाणीव झाली.
    त्याने पटदिशी राजलक्ष्मीची मिठी सोडवली आणि खाली पडलेल्या बंदुकीत पुन्हा दोन काडतुसे भरली आणि सावधपणे समोरच्या जंगलात पाहू लागला .

    समोरच्या जंगलातून १०/१२ बंदुकधारी व सैनिकी वेशातील सूर्याजी दिसला.
    सूर्याजीला पाहताच राजलक्ष्मी म्हणाली ….सूर्याजीराव आपल्या दोघांची भेट घडवून देण्यासाठीच इथवर आले आहेत ..!
    काय ? धना प्रश्नार्थक मुद्रेने बोलला ..!
    होय, त्यांनी मला इथे फक्त तुम्हाला सपुर्द करण्यासाठी आणले आहे.
    हे ऐकताच धना म्हणाला ,कसे शक्य आहे राजलक्ष्मी ?
    एवढी हजारांची फौज घेऊन आपली भेट कशी घडू शकली असती, केवळ आपल्या प्रेमाची ताकद म्हणून आज आपण एकमेकासमोर आहोत.
    मला पुन्हा एकदा तुला नाही हरवायचे असे म्हणत धनाने राजलक्ष्मी चा हात धरला आणि गुप्त वाटेने किल्ल्याकडे जायला निघाला ..!
    राजलक्ष्मी आपण किल्ल्यात जावू..तिथे बऱ्याच गुप्तवाटा आहेत. तिथून आपण निसटून जाऊ..पुढे सुरक्षित ठिकाण पाहून ठरवूया पुढे काय करायचे ते ??
    आणि धना लगबगीने जायला निघाला.
    पाठीमागून सूर्याजी राजलक्ष्मी आणि धना ला हाक मारू लागला होता , त्याच्या हाका कानावर पडून देखील दोघे बेफान होऊन किल्ल्याकडे दौडत होते…!

    सेनापती आणि शेलार मामा जवानांच्या हल्ल्यातून कसेबसे बचावले आणि त्यांच्या गुप्तवाटेला लागले होते, मामानी सेनापतीला प्रश्न केला कि ..सेनापती धना कुठे आहे ?
    सेनापती उत्तरले ….मामा काळजी नसावी ..धना किल्ल्यामार्गे पुन्हा गुप्तवाटेने कोकणात उतरेल….!

    काय ????

    मामांच्या भुवया उंचावल्या …ते स्तब्ध होऊन बोलले ..अरे काय हे केले हे त्याने ?
    धना का पुन्हा गेला किल्ल्याकडे …तुम्हाला माहिती नाही पण किल्ला आता काही क्षणात आसमंतात उडून संपून जाईल..आम्ही तिथे स्फोटके पेरेली आहेत ,कारण जरी सैन्य आत शिरले तरी त्यांना संघटनेचे काहीच गुपिते सापडू नयेत म्हणून….!
    मूर्खपणा केला तुम्ही..आता होता होईल तितल्या लवकर धानापर्यंत पोहचायला हवे ..असे म्हणत शेलार मामा आणि सेनापती पुन्हा किल्ल्याकडे दौडू लागली.

    इकडे गावकरी, पाटील व इतर मंडळी सैन्याला शरण आली होती.
    आम्ही सुर्याजीरावांच्या बरोबर गुप्त मोहिमेवर आहोत एवढेच सैन्यातील अधिकार्यांनी त्यांना सांगितले होते.गावकरी सैन्याच्या सोबत येऊ शकत नाहीत असे सांगून अधिकार्यांनी त्यांची शस्त्रे काढून घेतली..!
    आणि सैन्यातीक तुकड्या ठरल्याप्रमाणे पुन्हा किल्ल्याकडे दौडू लागल्या.

    सैन्याने सुर्याजीरावना गाठून सदर हल्ला गावकर्यांनी केला होता असे सांगितले.
    सुर्याजीनी वस्ताद आणि पाटलांना बोलावून घेतले .झालेली सर्व हकीकत सांगितली आणि धना आणि राजलक्ष्मी पुढच्या जंगलात गेली असल्याचे सांगितले..!
    सूर्याजीने एक काम तर केले होते कि त्याची इच्छा होती कि धना आणि राजलक्ष्मी भेटावेत …आता उरले होते कर्तव्य ..!
    करारी आवाजात सूर्याजीने सर्वाना आदेश दिले कि धना ज्या व्यक्तीसोबत पाटलांची मुलगी आहे त्याना गोळी मारू नये …इतरांना सोडू नये..!
    समोरच्या जंगलापलीकडे त्या दरोडेखोर लोकांचा अड्डा आहे ,तो नष्ट करून येण्याचे आदेश आपल्याला वरीष्ठांनी दिले आहेत.
    आता खर्या लढाईला प्रारंभ होईल,असे म्हणत सूर्याजी व सारी फौज किल्ल्याकडे चालू लागली.

    धना आणि राजलक्ष्मी सुध्दा किल्ल्याकडे दौडत होती आणि दुरून हाकेच्या अंतरावर किल्ला दृष्टीस पडला..!
    धापा टाकत दोघेही किल्ल्याकडे जाऊ लागली.

    इकडे गुप्त चोरवाटेने शेलार मामा आणि सेनापती धनाकडे किल्ल्याच्या मार्गाला जाऊ लागली.
    मामा विचार करत होते कि जवळपास ३ तास उलटून गेले आहेत,आता काही क्षणात वेळ नियोजित स्फोट होणार …आता धावत पळत जाऊन धना ला वाचवणे काही केल्या शक्य नाही ,तेव्हा त्यांनी सेनापतीला सांगितले कि उंच झाडावर चढून आपल्या संघटनेचा धोक्याची सुचना देणारा सांकेतिक आवाज काढ ..आता याशिवाय पर्याय नाही.
    हे ऐकताच सेनापती सरसर एका उंच झाडावर चढला ..आणि एक गुप्त सांकेतिक आवाज जो केवळ संघटनेच्या लोकांनाच माहिती असे आणि तो आवाज म्हणजे धोक्याची सूचना आहे असे सर्वाना माहिती होत असे असा आवाज काढायला सुरवात केली ……….!!!!!

    धापा टाकत असलेल्या धनाला हा आवाज कानी पडला आणि त्याचे धावते पाय थांबले ..केवळ काही अंतरावर किल्ल्याचे प्रवेशद्वार होते.
    का थांबला….श्वासांचे उसासे टाकत राजलक्ष्मी बोलली….!
    हा धोक्याचा आवाज आहे राजलक्ष्मी ..नक्कीच काहीतरी धोका आहे म्हणून माझे साथीदार मला हे आवाज देऊन सूचित करत आहेत …!
    पण नेमका धोका काय असावा ?
    धना विचार करू लागला इतक्यात पाठीमागून सूर्याजीची सेना दिसू लागली.
    सूर्याजीने धना आणि राजलक्ष्मीला पाहिले ….सेनेला आधीच आदेश होते कि याना गोळी घालू नये …सूर्याजीने धनाला मोठ्या आवाजात सुचना दिली……धना तुम्ही आमच्या बंदुकीच्या इशार्यावर आहात ….कृपा करून शरण या …मी वचन देतो कि तुमचे लग्न लावून देऊ …!
    मला,गावकार्याना तुझी गरज आहे.
    सूर्याजीचा आवाज कानी पडताच धना राजलक्ष्मीकडे पाहू लागला…!
    राजलक्ष्मीने धना चा हात पकडला ,आता मात्र राज लक्ष्मी कोणताही धोका घेण्याच्या मनस्थितित नव्हती..ती धनाचा हात पकडून किल्ल्याकडे धावू लागली ..धनाची बंदूक खांद्याला लटकत होती ……इकडे सेनापती मोठ्या रवाने धोक्याचा आवाज धनापर्यंत पोहचावेत होते ..पण धनाला ते ऐकू येऊनही काही फायदा नव्हता….!!
    आता जगायचे मरायचे ते राजलक्ष्मी सोबत..!

    धना आणि राजलक्ष्मी किल्ल्याच्या आत प्रवेशली..!
    काही क्षण भुतकाळात विलीन झाले.
    सूर्याजीने किल्ल्यात प्रवेश करायची योजना सर्व सेनेला सांगितली आणि ,सर्वानी बंदुका सरसावल्या आणि सारी सेना किल्ल्याकडे जायला धावली ……
    इतक्यात धडाड …..धड …धड …धड़

    करत तो प्रचंड किल्ला आसमंतात उडून गेला…ज्वालेचे प्रचंड लोळ आभाळात उमटले ..मोठमोठ्या शिळ्या गुलाल उधळावा तश्या क्षितिजावर फेकल्या गेल्या ..या ज्वालेच्या उष्णतेने किल्ल्याकडे धावत असलेली सेना क्षणात मागे फिरली आणि जीव वाचवू लागली ….स्फोटामागे स्फोट अशी जणू मालिकाच सुरु झाली..!
    आगीच्या प्रकाशात सुर्याजी मागे हटत होता आणि त्याच्या डोळ्यातून आश्रु वाहू लागले होते …त्याने गगनभेदी किंचाळी केली…धना..!!
    कधी नव्हे एवढे दुख त्याच्या काळजाला चिरत होते..!
    धाय मोकलून तो रडू लागला….!
    उंच झाडावर असलेल्या सेनापतीला त्या आगीचे प्रचंड तांडव दिसले आणि तो खाली उतरला ….मामा आणि ते दोघेही चिंताग्रस्त झाले आणि गुप्त वाटेने तेही पसार झाले …दोघांच्या मनात मोठा प्रश्न होता ..कि धना …काय झाले असेल त्याचे देव जाणे ….!!
    मामा मोठे काळीज करुन बोलले..जगला तर आपला..आणि नाही तर आई भवानीचा..चला आपण चुकायला नको,त्वरेने महाराष्ट्र सोडला पाहिजे.

    सुर्याजीच्या अश्रूचा बांध फुटला होता ..पाटील ,वस्ताद दोघेही गहिवरून रडत होते आणि सारी सेना पुन्हा हताश होऊन कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती..!

    दिवस उजाडला …उजाडलेल्या किल्ल्याच्या अवशेषात वनअधिकारी /पोलीस यंत्रणा तपास करू लागले ..केवळ दगड आणि कोळसा याखेरीज काहीच दिसत नव्हते..!
    एका दगडांच्या ढिगाबाजूला एक बंदूक काळीकुट्ट होऊन जळून पडली होती..!
    लंगडत लंगडत सूर्याजी तिथे आला आणि गुडघे टेकून रडू लागला..!
    त्याच्याकडे शब्द नव्हते या प्रेमाला उपमा द्यायला ..!
    जी काही गुपिते होती ती धना आणि राजलक्ष्मीच्या सोबत जळून खाक झाली होती …..खिन्न मनाने सूर्याजी व सारे पथक कोल्हापूरला परतले..!

    धनाच्या गावात रडारड सुरु झाली ..गावावर शोककळा पसरली होती.
    धना आणि राजलक्ष्मी ने एक नवाच इतिहास घडवला होता..!
    धना आणि राजलक्ष्मी दोघेही अमर झाली होती.
    बघता बघता सहा महीने लोटली.
    आजही गावात कोणी लग्न केले तर जिथे धनाची बंदूक सापडली त्या दगडी कातळात तिथे जाऊन दर्शन घेऊन गावातील नवदाम्पत्य संसार सुरु करत असे..!
    त्या जागेला सार्या पंचक्रोशीत “धना” चे ठाणे नाव पाडले होते.
    अनेक नवे मल्ल मोठ्या कुस्तीला जायच्या आधी धना व राजलक्ष्मी जिथे संपली त्या “धना” च्या ठाण्यात खणा नारळाने ओटी भरून मगच कुस्ती लढत असे ..!
    कित्येक प्रेम करणारी युगले त्या काळ्या दगडात असलेल्या “धना राजलक्ष्मी” ला नवस करत असे कि त्यांचे प्रेम यशस्वी होऊदे आणि चमत्कार असा कि त्यांचे प्रेम यशस्वी होत असे ….!
    धना आणि राजलक्ष्मी हे कधीच एक होऊ शकले नाहीत ..मात्र एकत्र मरू मात्र शकले होते.
    धनाने संघटनेचे गुपित कोणालाच कळू दिले नाही ….आणि मीही आजवर कोणाला बोललो नाही …..!

    डायरीच्या पानावर निशिगंधाचे अश्रू पडले ….राजनंदिनी रडत रडत सारे ऐकत होती..!
    डायरीचे पुढचे पान पल्टायची इच्छा तिची होत नव्हती..!

    एव्हाना दिवस उजाडून गेला होता ..दोघीही आवरून कुठेतरी निघाल्या होता…निशिगंधा आणि राजनंदिनी त्यांच्या कार मधून कुठे निघाल्या होत्या ?
    त्या दोघींच्या डोळ्यात दिसत होते “धना ” च्या ठाण्याकडे

    मार्ग विचारात विचारात त्या “धना” च्या ठाण्या पर्यंत पोहचल्या.
    अनेक कोल्हापूरचे पैलवान हात जोडून काहीतरी मागणे मागत होते.
    तर काही प्रेमीयुगल प्रेमाचे यश धना ला मागत होते ..आणि ती युगले एकमेकांच्या मिठीत मोठ्या विश्वासाने विसावत होती कि आता धना आपले प्रेम यशस्वी करणार …!
    त्या दोघीही गुडघे टेकून खाली बसल्या …त्यांचे अश्रू आता लपत नव्हते ..धाय मोकलून त्या रडू लागल्या होत्या ..!
    काय विलक्षण इतिहास घडला होता या मातीत.
    धनाचे ठाणे आता बऱ्यापैकी पर्यटन स्थळ झाले होते.
    निशिगंधा व राजनंदिनी दोघींना धना आणि राजलक्ष्मी स्पष्ट दिसत होती ….गळ्यात गोळ्यांचा पट्टा आणि बंदूक अडकवलेला धिप्पाड धना आणि कोमल,नाजूक आणि सौंदर्यवती राजलक्ष्मी …
    अश्रुंचा अभिषेक सुरु झाला.
    भरल्या नयनांनी त्या पुन्हा वाड्यावर आल्या …..!!

    जेवणात दोघींचे लक्ष नव्हते,दोघी एकमेकांशी बोलत पण नव्हत्या ..!
    “आई…पुढे काय झाले ग ?”

    राजनंदिनी च्या बोलण्याने निशिगंधा ला आठवले कि डायरीचे एक पान वाचायचे राहिले आहे…..
    त्वरीत निशिगंधाने डायरी हातात घेतली आणि पुढचे एक पान वाचू लागली…

    धना आणि राजलक्ष्मी च्या जाण्याने माझ्या आयुष्यात पुन्हा दुखाने वेधून टाकले.
    किल्ल्यातील इतर सहकारी कुठे गेली ?
    त्यांचे परत काय झाले असावे अश्या विचाराने मी पुन्हा चिंताग्रस्त झालो.
    या सार्या प्रकारात एक दिवस माझ्या हातात राजस्थान ला माझी बढ़ती होऊन बदली झाल्याचे पत्र पडले.
    खिन्न मनाने मी राजस्थान ला जायला निघालो.
    धनाचे गावकरी मला जाऊन देत नव्हते ..पण मोठ्या निश्चयाने मी जायचे ठरवले होते.
    धना आणि राजलक्ष्मी ला विसरण्याचे हेच माध्यम होते….!
    मी राजस्थान ला गेलो काही दिवसातच तिथे रुळलो,.!
    माझा कुस्तीचा नाद काही कमी होत नव्हता,या दुखाच्या काळात कुस्तीने मला तारले,जीवन्त ठेवले.
    वेळ मिळेल तसा मी भागातील कुस्त्या पहायला जात असे ,तिथली पैलवान मंडळी मला पंजाब,दिल्ली ला कुस्त्याला बोलावत असे…..!
    मला मनोमन वाटे कि माझ्या इतका कुस्ती शौकीन जगात दुसरा नसेल ….!
    आणि क्षणात डोळ्यात पाणी येई आणि धना आठवे …माझे कुस्तीप्रेम काहीच नाही …धना आज असता तर काय माहिती कोणाच्या वेशात कुस्ती खेळून कुस्ती जिवंत ठेवली असती…!
    दिसामागुन दिवस जात होते…

    आणि एके दिवशी दिल्लीच्या एका मोठ्या कुस्ती मैदानात एक प्रमुख कुस्ती लागली ….आणि मला ते निर्धारी डोळे दिसले आणि माझे रोमरोम थरकापू लागले ..माझ्या घसा सुकू लागला …..दिल्लीच्या एका प्रसिध्द मल्लाला ढाक लावून विजयी आरोळी देणारा तो मल्ल जणू धना भासत होता …भासत होता ?
    नव्हे नव्हे तो माझा धनाच होता …माझा धनाच होता ….!!!!

    समाप्त

    ………………..*”धना – २”* लवकरच येत आहे.

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    लेखन, शब्दांकन, कल्पना : पै. गणेश मानुगडे

    सुचना :

    ह्या कादंबरीच्या प्रत्येक भागाविषयी आपणांस काय वाटते, आपण आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर आवश्य लिहा, तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    या मालिकेचे / कादंबरीचे लेखक : पै. गणेश मानुगडे आहेत.

    जर आपण ही मालिका फॉरवर्ड करत असाल तर भागाच्या शेवटी लेखकाच्या नावाचा उल्लेख आवश्य करावा.

    – वितरक: नवनाथ देवकर (लेखकाच्या संमतीने आणि परवानगीने)

    Like

Leave a reply to Kishor Mundhe Cancel reply